शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मांडले अनेक मुद्दे
मुंबई, दि.४: शिवसेनेत मोठ्या बंडानंतर सत्ता गमावलेल्या उद्धव ठाकरेंनी आज भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका लढून दाखवा, असे आव्हान त्यांनी शिंदे-भाजप यांना दिले. असा खेळ करण्यापेक्षा जनतेच्या दरबारात जाऊया, चुकलो तर जनता आम्हाला घरी बसवेल, तुम्ही चुकला असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल.आज शिवसेना भवनात शिवसेना जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी प्रतिपादन केलं.
जाणून घ्या नेमके कोणते मुद्दे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनातील बैठकी दरम्यान व्यक्त केले
- उद्धव साहेब ठाकरे यांचे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या समोर व्यक्त केलेले ठळक मुद्दे
लढायचे असेल तर सोबत राहा - भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव
- हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा
- असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल, तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल
- घटना तज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ञ आहात
- सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा
- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या
- विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान