मुख्यमंत्र्यांच्या फोन नंतर मनसे तर्फे मनसैनिकांना सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ४: राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता राज्य सरकार लॉकडाऊन लावू शकतं. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संकेतही दिले.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करत लॉकडाऊन ला सहकार्य करण्याची विनंती केली. मनसे तर्फे याबाबत ट्विटर द्वारे जाहीर माहिती देण्यात आली.
वाचा ट्विट मध्ये नेमकं काय म्हटलं गेलं
“राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं.”