“महाविद्यालयं सुरु करायची की नाही या विषयी अद्याप निर्णय झालेला नाही” – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
शाळा सुरू करायचा निर्णय सारासार विचार करूनच घ्यावा. सरसकट निर्णय करून चालणार नाही, असा सल्ला विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर शाळा सुरु करायाच्या की नाही या विषयी निर्णय घ्यायच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
मात्र महाविद्यालये अद्याप सुरु करायची की नाही या विषयी अद्याप तरी निर्णय झालेला नसल्याचं स्पष्टीकरणही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरात दिलं.