ठाणे जिल्ह्यातील ५९ टक्के नागरिकांनी घेतला कोरोना लसीची पहिली डोस
ठाणे, दि.२४: ठाणे जिल्ह्यात सुमारे ५९ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा घेतल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी काल जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत सांगितलं.
अंथरूणाला खिळलेले रुग्ण, गर्भवती, बेघर, भिकारी आणि मनोरुग्ण यांच्या लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याचे आदेश या वेळी आरोग्य यंत्रणेला देण्यात आले. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजून लसीची दुसरी मात्रा घेतलेली नाही त्यांनी लसीकरण तातडीनं पूर्ण करून घेण्याचे आदेशही देण्यात आले.