Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“.. जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा” – अभिनेते सुबोध भावे

“.. जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा” – अभिनेते सुबोध भावे यांनी टोचले कंगणाचे कान

मुंबई, दि. ४: सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरणाचा तपास एका बाजूला सीबीआय कडून चालू असताना दुसऱ्या बाजूला गलिच्छ राजकारण चालू असल्याचे दिसतेय. यात सध्या कलगीतुरा रंगलाय तो अभिनेत्री व भाजप समर्थक कंगना राणावत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात. कंगना राणावत ने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर शी केल्यावर संजय राऊत यांनीही तिला मुंबई सोडून जाण्याचा सल्ला दिला.

यावर हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी “उचलली जीभ आणि लावली टाळ्याला” म्हणत कंगणाला सुनावले आहे. तसेच मराठी सिने सृष्टीतील दिग्गज अभिनेते सुबोध भावे यांनीही ट्विट करत कंगणाला खरी-खोटी सुनावली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, “ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा. जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!”

आणखीही काही नट-नट्यांकडून कंगणाच्या मुंबईवरील टिकेचा समाचार घेतला जात आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *