Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सोलापूर येथे अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान

सोलापूर येथे अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवेढा तालुक्यातील रड्डे, हुन्नुर, शिरनांदगी चिक्कलगी, मारोळी परिसरात काल सायंकाळ पासून जोरदार वारा सुटायला सुरुवात झाली आणि त्यानंतर अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे घड जमिनीवर पडल्याने त्यातील मणी फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागेसोबत, डाळिंब आणि ज्वारीच्या पिकला हि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळाला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *