‘या’ विषयामुळे मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले, “उद्धवा अजब तुझे सरकार”
मुंबई: उद्या दि. २३ जानेवारी रोजी गोरेगाव येथे मनसेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन होत असून तत्पूर्वी राजकारण तापायला सुरुवात झालीय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज दोन ट्विट करत ठाकरे सरकार व शिवसेनेवर टीका केली आहे.
पहिल्या ट्विट मध्ये त्यांनी २६ जानेवारी पासून पोलीस दलात सामील होणाऱ्या अश्वदलाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलीस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं “उद्धवा अजब तुझे सरकार””
जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलीस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं "उद्धवा अजब तुझे सरकार" pic.twitter.com/MhOnra2x6t
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 22, 2020
पुढच्या ट्विट मध्ये तर त्यांनी उद्याच्या सभेचे थेट प्रक्षेपण लोकांना पाहता येऊ नये म्हणून सरकार वीज महामंडळाला हाताशी धरून विघ्न आणत आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे. शिवाय एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्याच्या अधिवेशनामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याचे म्हणाले.”
Cheap tactics by govt to shut cable pic.twitter.com/ZgcwaMgiVB
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 22, 2020