तरच…भारत विश्वचषक जिंकेल : पाँटिंग
नवी दिल्ली: भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नशीब चांगले असेल तर भारतच हा विश्वचषक जिंकेल असे मत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिगने व्यक्त केले आहे. इग्रंजी प्रासर माध्यमांशी बोलतना पाँटिंगने विराट बद्दल आपले मत मांडले आहे.
“विश्वचषकातील भारताचा प्रवास हा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीवर अवलंबून आहे. विराटची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी ही कौतुकास्पद आहे. त्यामुळे मला वाटते की, यंदाच्या विश्वचषकमध्ये भारत हा सर्वांसाठी धोकादायक संघ आहे” असे पाँटिंग म्हणाला.
२०१५ विश्वचषक सामन्यात महेंद्र सिंग धोनीने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्स हा संघ रिकी पाँटिगच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे.