येत्या लोकसभा निवडणुकीत युती न झाल्यास सेनेचं नुकसान – रामदास आठवले
यंदाच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजप यांची युती होणं गरजेचं आहे. २०१९ च्या निवडणुकीत युती न झाल्यास सर्वात जास्त नुकसान शिवसेनेचे होणार आहे, असे भाकित भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केले आहे.
शिवसेना-भाजपने एकत्र यावं, यासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे. शिवसेना-भाजपने युती करावी यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो आहे. लवकरच उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेणार असल्याचं आठवले म्हणाले. मला पुन्हा एकदा लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा आहे, त्यासाठी शिवसेनेने आपल्या कोट्यातली दक्षिण मध्य मुंबईची जागा भारतीय रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी मागणीही आठवले यांनी यावेळी केली.
वंचित आघाडीच्या मत ध्रुवीकरणाचा फायदा हा आमच्या युतीलाच होणार आहे असेही ते म्हणाले.