राहुल गांधी यांचे मोदींवर टीकास्त्र
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांची पहिली सभा धुळे येथे पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ राजकारण डोळ्यांसमोर ठेवून काम करीत आहेत तसेच मोदी हे प्रसिद्धीशिवाय पाच मिनिटेही राहू शकत नाहीत अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
काँग्रेस सत्तेवर आल्यास एसआरए योजने अंतर्गत प्रत्येकाला 500 चौरस फुटांचे घर देऊ अशी घोषणाही राहुल गांधी यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ काँग्रेस अध्यक्ष गांधी यांनी शुक्रवारी धुळे येथून केला.
रोजगाराची निर्मिती न करत मोदी यांनी तरुणांची फसवणूक केली, नोटाबंदीचा निर्णय घेऊन सर्वसामान्यांचे हाल केले, लहानमोठे उद्योगव्यवसाय देशोधडीला लावले आणि देशासमोर आर्थिक संकट निर्माण केले असे आरोप करतानाच या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मोदी आणि भाजप नेत्यांना विचारा असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले आहे.