Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“पुण्यात तूर्तास संपूर्ण टाळेबंदीची गरज नाही”

वाचा केंद्रीय पथकातील सदस्यांच नेमकं मत काय

पुणे, दि. १२: पुणे आणि परिसरातील कोरोनाचा सध्याचा प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्या लक्षात घेता जारी करण्यात आलेले निर्बंध पुरेसे असून संपूर्ण टाळेबंदीची तूर्त गरज नसल्याचं स्पष्ट मत केंद्रीय पथकातील सदस्यांनी व्यक्त केलं आहे. मात्र त्याचवेळी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात पुरेसा समन्वय नसल्याचंही या पथकानं म्हटलं आहे. जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी या पथकातील डॉ. जुगल किशोर आणि डॉ. घनश्याम पांडे या सदस्यांच्या अभिप्रायाचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे.

मात्र केंद्रीय पथकानं असं मत नोंदवलं असलं तरी कोरोना नियंत्रणासाठी यापुढे संपूर्ण राज्यासाठी एकाच प्रकारचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याने आता सरकार काय निर्णय घेणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागून राहीलं आहे.

दरम्यान टाळेबंदीबाबत पुणे व्यापारी महासंघ, पालिका आणि जिल्हा प्रशासन आणि पोलिस यांच्यात काल रात्री उशीरा विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. मात्र या बैठकीत दुकानं खुली ठेवण्याच्या मागणी बाबत कोणताही तोडगा निघू नं शकल्याने सर्वसामान्य व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *