पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्रातील २ सुपुत्र शहीद
गुरुवारी जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आले आहे.
नितीन राठोड आणि संजय राजपूत अशी या जवानांची नावे असून ते दोन्ही जवान बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
संजय राजपूत हे बुलढाण्यातील मलकापूरचे रहिवासी असून ते सीआरपीएफच्या 115 बटालियनचे जवान होते. तर नितीन राठोड हे लोणारजवळच्या चोरपांगरा गावचे सुपुत्र होते.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे 42 जवान शहीद झाले. आदिल दार या दहशतवाद्याने हा हल्ला केला. आदिल हा दक्षिण काश्मीरमधील काकेपुराचा रहिवासी आहे. गेल्याच वर्षी तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता.