पाटोद्यातील भास्कर पेरे-पाटील यांच्या वर्चस्वाला २५ वर्षांनी धक्का
औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत पाटोदा येथील माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांना या निवडणुकीत अनपेक्षित धक्का बसला आहे.
गेली २५ वर्षे त्यांचं पाटोदा ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व होतं. परंतू या निवडणुकीत त्यांनी माघार घेत आपल्या मुलीला उभं केलं.
परंतू त्यांच्या कन्येचा पराभव झाला असून त्यापाठोपाठ पेरे पाटील यांचं पाटोदा ग्रामपंचायतीवर असलेलं वर्चस्वही संपुष्टात आलेलं आहे.