भाजप प्रदेशाध्यक्ष चांद्रकांत पाटील यांच्या खुद्द गावातच भाजपचा दारुण पराभव
कोल्हापूर, दि.१८: भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या ग्रामपंचायत निवडणूकित चक्क त्यांच्याच गावातून धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सरशी झाली असून सेनेचा ६ जागी विजय झाला तर भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या युतीला ३ ठिकाणी विजय संपादित करता आला.
संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेली ही निवडणूक चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेची केली होती. शिवसेनेच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांनी काटे की टक्कर दिली. निवडणुकीतील सेनेच्या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी “गाव करील ते राव काय करील” म्हणत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
लिंक क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा