पंढरपुरच्या विठोबाचे सोन्या-चांदीचे दागीने वितळवायला राज्य सरकारची मंजुरी
पंढरपूर: भाविकांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आतापर्यंत अर्पण केलेले सोन्या चांदींचे दागिने आता वितळवण्यात येणार आहेत. याकरता शासनाच्या न्याय आणि विधी विभागाने विठ्ठल मंदिर समितीला परवानगी दिली आहे. यामध्ये सुमारे १९ किलो वजनाच्या सोन्याच्या आणि ४२५ किलो वजनाच्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. कार्तिकी यात्रेनंतर मुंबई इथल्या रिफाइनरीत शासनाने निर्देश दिल्यानुसार सोने वितळवण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. शासनानं या प्रक्रियेसाठी न्याय आणि विधी विभागाचे सहसचिव सुभाष कर्हादळे यांची नियुक्ती केली आहे. वितळवलेल्या सोन्या- चांदीपासून कोणते दागिने बनवायचे याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे.