विश्वासघात : पाक लष्कराचा भारतीय चौक्यांवर गोळीबार अजूनही चालूच
शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून तोफाचा वापर करून भारतीय चौक्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज पहाटे तीनच्या सुमारास पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. भारतानेही पाकिस्तानच्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सकाळी ६.३० च्या सुमारास हा गोळीबार थांबला.
भारत पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याऐवजी पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. एका बाजूला शांततेची भाषा करणारे पाकिस्तानी दुसऱ्या बाजूला भारताच्या नियंत्रण रेषेवर येऊन भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहेत. हा फार मोठा विश्वासघात आहे. आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांची अशा कारवायांना मूक संमती आहे असे म्हणाणे अतिशयोक्ती ठरू नये.