जात, पंथ, भाषा आणि पक्ष पाहून काम केलं नाही – नितीन गडकरी
नागपूर: राज ठाकरेंनी विचारांच्या आधारावर युती करावी, त्यांनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती, असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते नागूपरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
जे जगात नाही ते नागपुरात करण्याचा प्रयत्न मी करत आहे. आजपर्यंत मी फक्त नागपूरचा विकास, भविष्यासाठी काम केलं. मी जात, पंथ, भाषा आणि पक्ष पाहून काम केलं नाही आणि करणारही नाही. गरिबाच्या विकासासाठी राजकारण करेन.
यंदाची लोकसभा निवडणूक जिंकण्याची साशंकता असल्याने शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी. असे मतही नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.