उद्यापासून होणार राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात
मुंबई, दि. १६ : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी सरकारनं सर्वपक्षीय सदस्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.