नाट्यगृहांत मोबाईल होणार नॉट रीचेबल; मुंबई महापालिका बसवणार जॅमर
मुंबई: नाट्यगृहात नाटक चालू असताना कोणाचा कॉल आला तर त्या नाटकातील नट व त्याचसोबत प्रेक्षकांचं लक्षही विचलित होतं. पण यापुढे या साऱ्या त्रासातून मुक्तता होणार आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील सर्व नाट्यगृहांत मोबाईल जॅमर बसवण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
काही दिवसांपूर्वी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महानगरपालिकच्या बैठकीत नाट्यगृहांत मोबाईल जॅमर बसवण्यासंबंधी मागणी केली होती.