नाशिक येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तूर्तास भरवणे अशक्यच – छगन भुजबळ
नाशिक, दि.२५: नाशिक इथे होणारे नियोजित ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तूर्तास भरवणे अशक्यच असल्याचे नाशिकचे संपर्कमंत्री छगन भुजबळ यांनी काल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या साहित्य संमेलन घेण्याबाबत निमंत्रकाना पत्र पाठवून संमेलन कधी घेणार याबाबत ३१ जुलै पर्यंत खुलासा करावा असे सांगितले. नाशिक मध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान हे साहित्य संमेलन होणार होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ते स्थगित करण्यात आले होते.