“अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाहीत, जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात”: मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मुंबई: बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध काढलेल्या आजच्या महामोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली. कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
राज ठाकरे यांच्या भाषणातील पाच महत्वाचे मुद्दे:
१. सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो.
२. माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
३. अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाहीत, जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे.
४. २०१२ च्या मोर्च्यात मी एका बांग्लादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता.ह्यांची मजल बघा. ह्यांना हुसकावलंच पाहिजे.
५. आज आम्ही मोर्च्याला मोर्चाने उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका.