कोकण रेल्वेसह परगावी जाणाऱ्या सर्व गाड्या ३१ मार्च पर्यंत स्थगित; फक्त ‘यांना’ वगळले
मुंबई/नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने थोड्याच वेळापूर्वी एक परिपत्रक काढत सर्व प्रवासी गाड्या व मेल एक्सप्रेस गाड्यांवरील बंदी ३१ मार्च पर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केले. यात कोकण रेल्वे महामंडळाच्या आखात्यारीत असलेल्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यातून फक्त उपनगरीय रेल्वे, मेट्रो यांना वगळण्यात आले आहे. सदर वाहतूक फक्त ठराविक वेळापत्रकानुसार चालणार असल्याचे रेल्वे मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.