“हा कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा विजय”
कोल्हापूर, दि.१६: कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान जयश्री चंद्रकांत जाधव यांना मिळाला आहे. त्यांनी १८ हजार ९०१ मताधिक्यानं हा विजय मिळवला आहे. जयश्री चंद्रकांत जाधव यांना शेवटच्या फेरी अखेर ९६ हजार २२६ मते तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
विधानसभा निवडणुकीतला माझा विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा तसंच कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. यापुढच्या काळात सर्वांच्या सहकार्यानं शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी आहे आणि विकासासाठी मी कटीबद्ध आहे, असं त्यांनी विजयानंतर सांगितलं.