Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बारावीचा निकाल जाहीर! कोकण विभाग यंदाही अव्वल; जाणून घ्या सविस्तरपणे

राज्यात एकूण ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे, दि. २५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल आज अखेर जाहीर झाला असून यंदाच्या वर्षीदेखील मुलींनी बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जाहीर निकालानुसार ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गत वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात २.९७ टक्क्यांची काहीशी घट झालेली दिसते. एकूण ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून ८९.१४ टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.

विभागनिहाय निकालावर नजर फिरवल्यास कोकण विभागाने यंदाही अव्वल येत आपले स्थान अढळ ठेवले आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.१ टक्के तर शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याने ९३.३४ टक्के निकालासह दुसरे स्थान पटकावले आहे. राजधानी मुंबईचा निकाल राज्यात सर्वात कमी म्हणजे ८८.१३ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात शिवाय तो पीडीएफ फाईल स्वरुपात डाऊनलोड ही करता येऊ शकतो. संकेत स्थळाची लिंक:  www.mahresult.nic.in

विभागनिहाय निकाल

कोकण – ९६.१

पुणे – ९३.३४

कोल्हापूर – ९३.२८

अमरावती – ९२.७५

औरंगाबाद(छ. संभाजीनगर) – ९१.८५

नाशिक – ९१.६६

लातूर – ९०.३७

नागपूर – ९०.३५

मुंबई – ८८.१३

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *