हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे पुण्यातील चर्चासत्र रद्द केल्याचा तुषार गांधींचा आरोप
पुणे: महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांचे आज पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “रिव्हिजिटिंग गांधी” हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळे हे चर्चासत्र रद्द करण्यात आल्याचा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे. आता यावरून राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत इतकं नक्की.