गणेशोत्सवासाठी यंदा रेल्वे २१४ विशेष गाड्या सोडणार
मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे २१४ विशेष गाड्या सोडणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तर पर्यावरणाचा विचार करून गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्ती टाळा आणि शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.
तरीसुद्धा घरगुती गणेश मूर्ती पीओपीची आणायचा आग्रह असेल तर ती फक्त दोन फुटांचीच असावी, अशी सूचना महापालिकेनं केली आहे. मात्र पीओपीच्या गणेशमुर्तींमुळे निसर्गाला होणारा धोका लक्षात घेता समुद्रात, जलाशयात पीओपी गणेश मूर्तीचं विसर्जन करायला बंदी असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्य़ा संकटामुळे मुंबईत गेली दोन वर्ष गणेशोत्सवावर निर्बंध होते.