१ जुलै २०२४ पासून नवे फौजदारी कायदे लागू होणार
नवी दिल्ली, दि. २४: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, भारतीय न्याय संहिता २०२३, आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ अंतर्गतच्या तरतुदी येत्या १ जुलैपासून लागू केल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे. यासंदर्भात गृहमंत्रालयानं आज अधिसूचना जारी केली. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात संसदेत ही तीनही फौजदारी न्याय विधेयके मंजूर झाली होती. हे तीनही कायदे याआधीच्या भारतीय दंड संहिता १८६०, फौजदारी प्रक्रिया संहिता १८९८, आणि भारतीय पुरावा कायदा १८७२ ची जागा घेणार आहेत.