राष्ट्रवादीला संपवणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही, धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका
बीड : काल महाआघाडीची दुसरी सभा परळीमध्ये पार पडली. या सभेत आपले विचार मांडताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस संपवणं हे चिक्की खाण्याएवढं सोपं नाही असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली. परळीमध्ये सहा जिल्हापरिषद नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवक आमच्या पक्षाचे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समारोपाची वाच्यता करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो,
चिक्कीताई… चिक्की खाण्याइतकं सोपं नाही ते. हिंमत असले तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत समोरासमोर या, कोण संपतो ते बघूच आपण. @NCPspeaks @INCMaharashtra @PawarSpeaks @AshokChavanINC @ChhaganCBhujbal pic.twitter.com/AK5kOz2855
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 23, 2019
या सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री परळीत आले होते, त्यांनी परळीवर टीका केली. मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्ही एक लक्षात ठेवा बऱ्याच सत्तेचा शेवट परळीत झाला आहे.
परळीत झालेल्या सभेला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांसह जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थिती लावली होती.
आपल्या देशात जे सरकार आहे ते जातीयवादी सरकार आहे ते संपवण्याची वेळ आता आली आहे. सरकारमुळे देशात कुणीही सुरक्षित नाही, संभाजी भिडेंसारख्या लोकांना संरक्षण देणारं हे सरकार आहे लोकांनी त्यांच्या मनातला आक्रोश मतपेटीत उतरवत आम्हाला विजयी केले पाहिजे असे जोगेंद्र कवाडे यावेळी म्हणाले.