Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“राज्य सरकारने लसींच्या पुरवठ्याबाबात केंद्राकडे बोट दाखवू नये” – देवेंद्र फडणवीस

“राज्य सरकारने लसींच्या पुरवठ्याबाबात केंद्राकडे बोट दाखवू नये” – देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ७: राज्यात कडक निर्बंध लादताना विविध क्षेत्रांचा विचार झालेला नाही. विविध क्षेत्र त्यामुळे प्रभावित झाली आहेत. अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसला आहे, अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना केली आहे.

हे लॉकडाऊनसदृश निर्बंध आहेत अशी टीकाही त्यांनी केली. व्यापारी आणि व्यायसायिकांमध्ये त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. या सरकारच्या बोलण्यात आणि करणीत फरक असल्याची टिका देखील त्यांनी केली.

छोट्या छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी केली. गरीबांचं जीवन आणि अर्थकारण प्रभावित होणार नाही, अशा पद्धतिनं नव्यांनं निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी करावी, असंही ते म्हणाले. केंद्र सरकारने लसीकरणाबाबत योग्य नियोजन केलं असून राज्य सरकारने लसींच्या पुरवठ्याबाबात केंद्राकडे बोट दाखवू नये, स्वतःचं व्यवस्थापन सुधारावं असा टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *