कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११ ने वाढली, एकूण रुग्ण ६३ – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई: राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असून कालचा ५२ वर असलेला आकडा हा आता ६३ वर पोहोचला आहे. यात आता मुंबई पुढे असल्याचे दिसते कारण वाढीव रुग्णांमध्ये १० मुंबईचे तर १ पुण्याचा आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषदेत महिती दिली.
आरोग्यमंत्र्यांनी सर्वांना उद्या रविवारी होणाऱ्या ‘जनता कर्फ्यु’ मध्ये सामील होण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारी कार्यालयांत वातानुकूलित यंत्रणा शक्यतो बंद ठेवण्याचं अथवा कमी प्रमाणात वापरावी असे निर्देश दिले. आपण स्टेज दोन मध्ये असून कोरोनामुळे राज्याचे आर्थिक नुकसान होत असून केंद्राने याकामी आर्थिक मदत करावी असे ते यावेळी म्हणाले.