“इतर देशांमार्गे भारतात शिरणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका मोठा..जाऊ शकतो पुढच्या टप्प्यात”
मुंबई: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज एक ट्विट करत कोरोना संदर्भात नवी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राज्यात आज कोरोनाचे ४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. ४९ पैकी मुंबईमधील एका व्यक्तीचा १७ मार्चला मृत्यू झालेला आहे. कोरोना बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.” याच सोबत आरोग्यमंत्र्यांना असेही आढळून आले आहे की काही लोकं इतर देशांमार्गे भारतात प्रवेश करत असून त्यामुळे आपण कोरोनाच्या पुढच्या स्टेज ला जाऊ शकतो.
आरोग्यमंत्री सध्या विविध इस्पितळांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. काही तासांपूर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही राज्यातील जनतेला कोविड-१९ शी लढण्याबाबत आवाहन केले होते.