आशिष शेलार मुख्यमंत्र्यांना म्हणाले, “तुझ्या बापाचं राज्य आहे का?”; पण आज घेतला यु-टर्न
मुंबई: काल वसईत एका कार्यक्रमात भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी ‘सीएए’ बाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी उल्लेख करत टीका केली. ते म्हणाले की, “शिवसेनेने बदललेले रंग एवढे आहेत की, सरड्यानेही आत्महत्या करावी. म्हणून सीएए महाराष्ट्रात लागू देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे काय? हा केंद्राचा कायदा आहे. अॅडव्होकेट जनरलचं मत घ्या. माहित नसेल तर अभ्यास करा. नसेल करता येत तर माझ्यासारखे वकील खूप आहेत. हा कायदा लागूच करता येणार नाही, ही भूमिकाच मांडता येऊ शकत नाही.” यावर आज शिवसेनेच्या वतीने मनीषा कायंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.