भाजप महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांची टीका
उस्मानाबाद: राज्यात अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, मात्र त्याकडे लक्ष द्यायला गृहमंत्र्यांना वेळ नाही, अशी टीका भाजपच्या महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केली. त्या उस्मानाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली.
तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर इथं अल्पवयीन मुलीवर चार दिवसांपूर्वी सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली. फरार आरोपींना तत्काळ अटक करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बंद पाळून निषेध व्यक्त केला. चित्रा वाघ यांनी अणदूर इथं जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
Source – AIR