केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांचं लोकसभेत स्पष्टीकरण
नवी दिल्ली: देशाची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी २ आपत्यं धोरण लागू करण्याचा सरकारचा विचार नाही, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण आकडेवारीनुसार २००५-०६ साली २ पूर्णांक ७ दशांश टक्के असणारा देशातला प्रजनन दर २०१५-१६ साली २ पूर्णांक २ दशांश टक्के एवढा खाली आला, असं त्यांनी सांगितलं.
केंद्र सरकारनं आवश्यक अन्न धान्याचे भाव स्थिर राखण्यासाठी वेळोवेळी काही उपाय योजले आहेत. यात आयात शुल्क, किमान निर्यात मूल्य यांच्या माध्यमातून निर्यात व्यवस्थापन, देशांतर्गत उपलब्धता लक्षात घेऊन निर्यात बंदी, साठेबाजीला आळा घालण्यासाठी दंड, इत्यादी उपायांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.