सीएए, एनारसी आणि ईव्हिएम विरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ ला संमिश्र प्रतिसाद
मुबई: आज सीएए, एनआरसी आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक देण्यात आली होती. देशभरात काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले तर काही ठिकाणी बंद सुरळीतपणे पार पडला. महाराष्ट्रात औरंगाबाद येथे एसटी अडवणाऱ्या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली तर यावेळी जमावाने त्यांचा कॅमेराही मोडला. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात बंदला हिंसक वळण लागले. जमावाने ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मुंबईत क्रोवफोर्ड मार्केट, नळ बाजार परिसरात १०० % बंद पुकारण्यात आला होता. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर काहीकाळ रेल रोको मुळे रेल्वेचं वेळापत्रक बिघडलं होतं. पनवेल परिसरातही दुकाने व कार्यालये बंद होती. दुपारी ३ वाजल्यानंतर या ठिकाणी बंद शिथिल झाला.