बृहन्मुंबई महापालिका हद्दीत येत्या ५ ऑगस्टपासून २० टक्के कपात
मुंबई दि.: जुलै संपून ऑगस्ट महिना सुरू झाला पण अद्याप म्हणावा तसा पाऊस पडलेला दिसत नाहीये. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात येत्या ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. जून, जुलै महिन्यात तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये सुमारे ३४ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या जुलैमध्ये ८५ टक्के जलसाठा होता, असं महापालिकेच्या जलविभागानं म्हटलं आहे.