Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“भाजप नेता म्हणतो माझ्या जाण्याने मंदिर अशुद्ध झालं. हे कोणतं राजकारण?” अरविंद केजरीवाल यांचा सवाल

“भाजप नेता म्हणतो माझ्या जाण्याने मंदिर अशुद्ध झालं. हे कोणतं राजकारण?” अरविंद केजरीवाल यांचा सवाल

नवी दिल्ली: आज दिल्लीत विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान चालू आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आप व भाजप या दोघांमध्ये मुख्यतः थेट लढत होत आहे. प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदिं सकट भाजपचे सर्व दिग्गज नेते असा सामना पाहायला मिळाला. आजचा मतदानाचा दिवसही याला अपवाद नव्हता.

अरविंद केजरीवाल यांच्या हनुमान मंदिर भेटीबाबत भाजपतर्फे काही नेत्यांकडून उपहासात्मक टिप्पणी करण्यात येत आहे. यासंदर्भात ट्विटर वर आपलं मत व्यक्त करताना

ते म्हणाले की, मी एका वृत्तवाहिनीवर हनुमान चालिसा चे पठण केले त्यावरून भाजप नेत्यांनी माझी खिल्ली उडवली. काल मी एका हनुमान मंदिरात गेलो तर एक भाजप नेता म्हणतो की माझ्या जाण्याने मंदिर अशुद्ध झालं. हे कोणतं राजकारण आहे? देव तर सर्वांचे आहेत. देवाने सर्वांना आशीर्वाद द्यावेत, भाजप वाल्यांनाही. सर्वांचं भलं होउदे.”

आज सकाळी अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत समस्त महिलांना मतदान करण्याचे आवाहन केले होते व त्याचे महत्वही विशारद केले. या ट्विट वर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केजरीवाल यांना महिलविरोधी म्हणत टोला लगावला. यावर आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, दिल्लीच्या महिलांनी कोणाला वोट द्यायचे ते ठरवले आहे. यावेळी पूर्ण दिल्ली मध्ये आपल्या परिवाराचे मत महिलांनीच ठरवले आहे. शेवटी घर तर त्यांनाच चालवायचे असते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *