“कोण काय म्हणतंय याच्याशी आम्हाला काहीएक देणंघेणं नाही” – मंत्री अनिल परब यांचा राज ठाकरेंना टोला
मुंबई दि.१ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत आज पत्रकारांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना छेडले असता ते म्हणाले की, “कोण काय म्हणतंय याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाहीये. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे व ते पाच वर्ष व त्यापुढील काळही टिकेल. सरकार चालण्यासाठी सक्षम नेतृत्व लागतं जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपाने आमच्याकडे आहे.”
पुढे भाजप नेत्यांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी एका मंत्र्याच्या मुलाचे नाव घेतले होते त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, “असे काही पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांजवळ द्यावेत.”