Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

देशात स्वामिनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य : मुख्यमंत्री केजरीवाल

Arvind-Kejriwal

दिल्ली: शेती हा देशातील प्रमुख व्यवसाय मानला जातो. परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर दिल्लीत स्वामिनाथन आयोग लागू होणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

केजरीवाल सरकार दिल्लीत लवकरच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून दिली आहे. देशात स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली पहिले राज्य ठरणार आहे. लवकरच दिल्लीतील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला योग्य प्रमाणात हमीभाव मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला तर त्यांना आत्महत्या करायची गरज पडणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास देखील होईल, असे केजरीवाल सरकारचे मत आहे. म्हणूनच दिल्लीत स्वामिनाथन आयोग लागू करण्याचा केजरीवाल सरकारने निर्णय घेतला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *