दिल्ली: शेती हा देशातील प्रमुख व्यवसाय मानला जातो. परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर दिल्लीत स्वामिनाथन आयोग लागू होणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
किसानों के लिए ख़ुश ख़बरी। दिल्ली सरकार का क्रांतिकारी क़दम। देश में पहली बार स्वामिनाथन आयोग दिल्ली में लागू होने जा रहा है। https://t.co/RHg7bVFVd7
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 6, 2019
केजरीवाल सरकार दिल्लीत लवकरच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून दिली आहे. देशात स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली पहिले राज्य ठरणार आहे. लवकरच दिल्लीतील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला योग्य प्रमाणात हमीभाव मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला तर त्यांना आत्महत्या करायची गरज पडणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास देखील होईल, असे केजरीवाल सरकारचे मत आहे. म्हणूनच दिल्लीत स्वामिनाथन आयोग लागू करण्याचा केजरीवाल सरकारने निर्णय घेतला आहे.