महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून दुष्काळग्रस्त भागासाठी ४ हजार ७१४.२८ कोटी रुपयांची मदत
जाहीर झाली आहे. एकूण सहा राज्यांना केंद्र सरकारने ७,२१४.०३ रुपयांची आर्थिक मदत मदत
जाहीर केली असून ४ हजार कोटी रुपयांची मदत महाराष्ट्राला जाहीर झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार
पडली. ७,२१४.०३ कोटी रुपयांची मदत नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या राज्यांसाठी मंजूर
करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यात महाराष्ट्राला ४,७१४.२८ कोटी रूपये, उत्तर प्रदेशसाठी
१९१.७२ कोटी रुपये, गुजरातसाठी १२७.६० कोटी रुपये, हिमाचल प्रदेशसाठी ३१७.४४ कोटी रूपये,
आंध्र प्रदेशसाठी ९००.४० कोटी रुपये, पुद्दचेरीसाठी १३.०९ कोटी रूपये, कर्नाटकसाठी ९४९.४९ कोटी
रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने
केंद्राकडे ७ हजार ९५० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवाला होता.
मात्र, राज्यासाठी केंद्राने यापैकी फ़क्त ४ हजार कोटींचीच मदत जाहीर केली आहे.