Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखान्याला गेल्या हंगामाचा सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर

वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट तर्फे दिले जाणारे २०२१- २२ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर

पुणे, दि. १४: पुणे जिल्ह्यात मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेनं २०२१-२२ या ऊस गाळप हंगामासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. सांगली जिल्ह्यातल्या डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखान्याला गेल्या ऊस गाळप हंगामाचा सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ११ विविध प्रकारात साखर कारखान्यांना पुरस्कार देण्यात येतात.  संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं की, येत्या २१ तारखेला संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला प्रदान केला जाणार आहे. सर्वोत्कृष्ट ऊस विकास आणि संवर्धन पुरस्कार पुणे जिल्ह्यातला दौंड साखर कारखाना आणि सोलापूर जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला विभागून देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार सांगली जिल्ह्यातल्या क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला तर सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार सातारा जिल्ह्यातल्या जयवंत शुगर्सला दिला जाणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *