Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

१४० दिवसांच्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरेचे उत्पादन

१४० दिवसांच्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरेचे उत्पादन

पुणे: राज्यातील उसाचा चालू गाळप हंगाम संपला असून या हंगामात एकंदर दहाशे बारा लाख टन उसाचं गाळप होऊन अंदाजे एकशे सहा लाख टन साखरेचं उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. सुमारे १४० दिवस चाललेल्या यंदाच्या हंगामात सरासरी  साडेदहा टक्के साखर उतारा मिळाल्याचंही ते म्हणाले. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही राज्यभरातील एकंदर एकशे नव्वद  साखर कारखान्यांनी गाळप केलं.
दरम्यान देशभरातल्या साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगामात सुमारे ३१८ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याबद्दलचे करार विविध तेल कंपन्यांशी केल्याचं साखर उद्योगातील सूत्रांनी काल सांगितलं. यंदा टाळेबंदी मुळे पेट्रोलचा खप तुलनेत कमी झाला. त्यामुळं इंधनात मिश्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या इथेनॉलची मागणी कमी झाली. तरी सुद्धा कारखान्यांनी एवढे विक्री करार केल्यानं समाधान व्यक्त होत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *