Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शरजील उस्मानी याला अटक करा”

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी यानं हिंदू समाजाबद्दल केलेलं वक्तव्य गंभीर, अवमानजनक, आणि आक्षेपार्ह असून, त्यावर राज्य सरकारनं तातडीनं कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.

एल्गार परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी काय झालं, याची जाणीव असताना, अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणं, किती चूक होतं, हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येतं, असं या पत्रात लिहिलंय. एखाद्या आयोजनाला परवानगी दिली, म्हणजे त्यात झालेले सारे प्रकारसुद्धा खपवून घ्यायचे, ही भूमिका योग्य नाही.

कुणीही यावं आणि अशी विधानं करून वातावरण खराब करावं, आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. राज्याची चिंता वाढवणारा आणि सर्वांच्या माना शरमेनं खाली घालायला लावणारा आहे. हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, अशी आशा फडणवीस यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *