भारताने राष्ट्रकूल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी एक रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली
प्रमुख वैशिष्ट्ये
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लव्हप्रीत सिंग याचे त्याच्या असामान्य कामगिरीबपद्दल केले अभिनंदन
- तेजस्विन शंकर याने इतिहास रचल्याबद्दल आणि राष्ट्रकूल स्पर्धेत पहिले पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. हे कांस्य पदक सुवर्णपदकापेक्षाही विशेष आहेः अनुराग ठाकूर
राष्ट्रकूल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी आज भारताने एक रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली आहेत. लव्हप्रीत सिंग याने कांस्यपदक जिंकल्यानंतर, ७८ किलो वजनी गटात ज्युदोत तुलिका मान हिने रौप्य पदक जिंकले. भारोत्तोलनपटू गुरदीप सिंग याने पुरूषांच्या १०९ किलो वजनी गटात कांस्य पदक जिकले. सौरव घोषाल याने कांस्य पदकाला गवसणी घातली तर तेजस्विन शंकर याने अॅथलेटिक्समध्ये उंच उडी या क्रीडाप्रकारात भारतासाठी पहिले पदक जिंकून इतिहास घडवला. भारताच्या पदकांची संख्या आता ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्यपदकांसह १८ वर गेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर तसेच देशभरातून नागरिकांनी पदक विजेत्यांच्या अप्रतिम कामगिरीबद्द्ल अभिनंदन केले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेजस्विन शंकर याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, तेजस्विन शंकर याने कांस्य पदक जिंकण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत उंच उडीमध्ये पदक जिंकणारा तू पहिला भारतीय खेळाडू ठरल्याबद्दल अभिनंदन. राष्ट्राला वैभव प्राप्त करून देण्यासाठी तू अनुकरणीय असा निर्धार दाखवला आहे. पुढील कित्येक प्रेरणादायी विक्रमांबद्दल माझ्या शुभेच्छा.
तुलिकाच्या कामगिरीची प्रशंसा करताना राष्ट्रपतींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुलिका मान हिचे राष्ट्रकूल स्पर्धेत ज्युदोमध्ये लढाऊ वृत्तीने रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. तू तरूण वय़ातच यश मिळवण्यासाठी लक्षणीय धैर्य आणि जिंकण्याप्रती उत्कट भावनेचे प्रदर्शन केले आहेस. भविष्यातील स्पर्धांमध्ये तू आणखी उत्तरोत्तर बळकट होत जाशील आणि अधिक विजय साध्य करशील.