“लसींचा तुटवडा असल्याने खाजगी लसीकरण केंद्रांवर लस दिल्या जाणार नाहीत” – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. ३०: राज्यात १३ हजार सरकारी वैद्यकीय आस्थापना आहेत, त्यामुळे राज्यात एका दिवशी १३ लाख लशींच्या मात्रा दिल्या जाऊ शकतात. म्हणून केंद्र सरकारने राज्याला जास्तीत जास्त लसींच्या मात्रा द्याव्यात, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली, ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
१ मे ला राज्यात प्रतिकात्मक स्वरूपात छोट्या प्रमाणावर लसीकरण केलं जाईल, केंद्राकडून जास्तीत जास्त लसींच्या मात्रा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरळीत होईल. सध्या लसींचा तुटवडा असल्याने खाजगी लसीकरण केंद्रांवर लस दिल्या जाणार नाहीत. या संदर्भात केंद्रांच्या आदेशांचं पालन केले जाईल, असेही ते म्हणाले. लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांनी दुसरी मात्र देखील आवर्जून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केले.