परदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केला विश्वास
नवी दिल्ली, दि.१२: गुरुनानक जयंतीनिमित्त यंदा सुमारे दीड हजार भारतीय यात्रेकरु पाकिस्तानातल्या कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देऊ शकतील, असा विश्वास परदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केला आहे. १९७४ च्या उभयपक्षी समझोत्यानुसार एकमेकांच्या हद्दीतल्या धार्मिक स्थळांना भेट देण्याची परवानगी परस्परांच्या नागरिकांना देण्याच्या कलमाअंतर्गत कर्तारपूर कॉरिडॉर २०१९ पासून यात्रेकरुंसाठी खुला झाला आहे. यंदा १७ ते २६ नोव्हेंबर दरम्यानच्या तीर्थयात्रेत पाकिस्तानातल्या दरबार साहिब, कर्तारपुरसाहिब, पंजा साहिब, देहरा साहिब, ननकाना साहिब आणि सच्चा सौदा या गुरुद्वारांचा समावेश आहे.
Source – AIR