महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १० हजार कोटी निधी
मुंबई: महाराष्ट्रात, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी दहा हजार कोटी रुपयांचा आकस्मिकता निधी उपलब्ध करून द्यायला राज्यमंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
राज्यातल्या सर्व शासकीय आणि अनुदानीत शाळांमधल्या ६ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांमधला दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरवायलाही काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली.
या योजनेसाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दृष्टीदोष असलेल्या मुलांना निहित पुरवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोचवला जाईल.
निरा उजवा आणि डाव्या कालव्यातील पाण्याचं समन्यायी वाटप करण्याचा निर्णयही राज्यमंत्रिमंडळानं आज घेतला.