जितेंद्र आव्हाड म्हणाले, “हे मी पाच वर्ष भोगले, घराची रेकी झाली”
ठाणे: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. दि. ५ एप्रिल रोजी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी एका अभियंत्याने आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती यानंतर याची परिणती त्या अभियंत्याला मारहाणीत झाली. याबाबत या अभियंत्याने काही गंभीर आरोप आव्हाड यांच्यावर केले पोलीस तक्रार करताना केले होते.
या घटनेनंतर वातावरण तप्त झालं आणि पुनः एकवार जितेंद्र आव्हाड यांना सोशल मीडिया वरून थेट यमसदनी धाडण्याचे मेसेज यायला लागले. अशाच एका मेसेज करणाऱ्याचे तपशील जोडत त्यांनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विट मध्ये ते म्हणतात की, “हे मी पाच वर्ष भोगले घराची रेकी झाली
कुणी केली हत्या करण्याचे ठरले कोण होते त्यात
असो आईचे आशीर्वाद
पुलिस कारवाई करतील ह्यावर”