Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद जळगाव कडे

जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे होणार संमेलनाचा कार्यक्रम

जळगाव, दि. 24: ९७ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरला होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी या बैठकीनंतर यासंदर्भातली माहिती दिली.

१९५२ मध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनानंतर तब्बल ७२ वर्षांनंतर अंमळनेरमध्ये हे संमेलन होणार आहे. संमेलनाचं स्थळ निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती या समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि सातारा इथल्या  संस्थेचं  दृकश्राव्य सादरीकरण पाहिलं.

या तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी आणि कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळ निवड समितीने सर्वानुमते अमळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळ या संस्थेची शिफारस केली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याला मान्यता दिली आहे.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *