Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

फेसबूक, ट्वीटर आदि समाज माध्यम वापरकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी ३ महिन्यांत तक्रार अपील समित्यांची स्थापना

समाज माध्यम वापरकर्त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी, केंद्र सरकार तीन महिन्यांत तक्रार अपीलीय समित्या स्थापन करणार आहे.   इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं या संदर्भात काल राजपत्रीत अधिसूचना जारी केली.  समाज माध्यम वापरकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

अधिसूचनेनुसार, प्रत्येक समितीमध्ये एक अध्यक्ष आणि केंद्र सरकारनं नियुक्त केलेले दोन पूर्णवेळ सदस्य असतील. दाखल केलेल्या तक्रारीवर, तक्रार अधिकाऱ्यानं दिलेला निर्णय मान्य नसेल तर वापरकर्ता, तक्रार अधिकार्‍यांकडून तक्रारीला उत्तर मिळाल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत, तक्रार अपीलीय समितीकडे अपील करू शकतो.   तक्रार अपीलीय समिती, तक्रार निवारणासाठी ऑनलाइन यंत्रणेचा अवलंब करेल, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *